ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत सुरु करा ;राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्धारे मागणी…..

कोल्हापुर / प्रतिनिधी
   ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत गरजेची असून राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी हातकणंगले विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे. निवेदन अध्यक्ष संदेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले .

   महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील , कार्याध्यक्ष अनिल साळोखे , शहराध्यक्ष आर.के.पोवार , महिला जिल्हाध्यक्ष सौ.शितल फराकटे, सौ. प्रविता सालपे युवकचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
    निवेदनात म्हटले आहे की, राज्याला बैलगाडी शर्यतीची मोठी परंपरा आहे. ग्रामीण अर्थकारण या शर्यतीच्या खेळांवर अवलंबून आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यवसायाशी जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत . ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे.
    महाराष्ट्रात बैलगाडी शैयतीमध्ये खिलार ह्या जातीचे बैल वापरले जात असतात. खिलार ही जात देशी गाईचा वंश म्हणून ओळखली जाते. खिलार जातीचे बैल शेतीमध्ये मशागत करण्यासाठी चांगल्या जातीचे बैल म्हणून ओळखले जात असतात. या बैलांची शाररिक क्षमता वाढविण्यासाठी शर्यत सारख्या खेळांची गरज आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
    इतर राज्यात बैलगाडी शर्यत सुरू आहे. तर महाराष्ट्रातच शर्यतीला बंदी का? असा सवाल शर्यतप्रेमी संदीप तोरस्कर यांनी यावेळी केला.
     बैलगाडी शर्यत हा ग्रागीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे. या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष डी.बी.पिष्टे साहेब यांनी मुश्रीफ यांच्याकडे केली.
    यावेळी बी.के.चव्हाण (सर्), नूतन महिला कार्याध्यक्ष सौ.दिपाली नलवडे, मोहन चौगुले, निहाल कलावंत, शहानवाज मुजावर, अल्ताफ हजरत, निलेश शिंगे, धनाजी पाटील, सौरभ निगवे, मयूर राजमाने, अविनाश गुरव आदीसह अन्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.

error: Content is protected !!