महाराष्ट्रातील महिला व मुली असुरक्षित -सौ. महाडीक ; शासनाच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीत आंदोलन …..

शिरोली / प्रतिनिधी
     शिवरायांचे नाव घेवून सरकार चालविण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली असुरक्षित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह विभाग व गृहराज्यमंत्री यांची आहे. पण तेच मंञी राहूल गांधींचा व्हायरल व्हिडिओ पाहून वेगळ्या कामात व्यस्त आहेत. अशी टिका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांनी केली.

पुलाची शिरोलीत राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करताना भाजप महिला आघाडी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, तालुकाध्यक्ष राजेश पाटील, पं.स.सदस्या डॉ.सोनाली पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील व इतर.

    सौ. महाडीक महिलांच्यावरील वाढत्या अत्याचारी घटनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीत आंदोलन प्रसंगी बोलत होत्या. तालुका अध्यक्ष राजेश पाटील व पं.स.सदस्या डॉ. सौ. सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    त्या पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील महिला व मुलींवर अनेक प्रकारच्या अत्याचारी घटना घडत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य शासन व गृह विभागाला अपयश आले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री हे स्व:ताचे अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडण्यात व्यस्त आहेत.
    यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, डॉ. सोनाली पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील यांची निषेध भाषणे झाली.
    यावेळी महिला मोर्चा उपाध्यक्षा पुष्पा पाटील, ग्रा.पं.सदस्या मनिषा खटाळे, तेजस्विनी पाटील, मधुरा चौगुले, स्वाती तानवडे, संदीप पोर्लेकर, संदीप तानवडे, संभाजी भोसले, दिलिप शिरोळे,शिवाजी गाडवे आदी उपस्थित होते.आभार डॉ.सोनाली पाटील यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महिलांनी हातात फलक घेवून निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

error: Content is protected !!