सलमान खान आणि एलान फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद -नाम. राजेंद्र पाटील (यड्रावकर ) ;पूरग्रस्तांसाठी घरबांधणी पायाभरणी समारंभ संपन्न

कुरुंदवाड /ता.२४- प्रतिनिधी

      सन 2019 च्या महापूरात शिरोळ तालुका पुरबाधित होऊन घरपडझडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची घरे उभारणी करण्याचा प्रयत्न करत असताना सलमान खान आणि एलान फौडेशनने खिद्रापूर गावाला दत्तक घेऊन सत्तर घरांचे बांधकाम करून देण्याची केलेली संकल्पना ही गोरगरिबांना तारणारी असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. खिद्रापूर ता.शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी करण्यासाठी एलान फौडेशन दिल्ली व अभिनेते सलमान खान यांनी घेतलेल्या सत्तर घरांच्या आज सोमवारी पायाभरणी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री डॉ. पाटील -यड्रावकर बोलत होते.

खिद्रापूर येथील पायाभरणी शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील -यड्रावकर डावीकडून व्यासपीठावर जिल्हाधिकारी दौलत देसाई,डावीकडून तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे-धुमाळ,पंचायत समिती सभापती सौ.कविता चौगुले,सरपंच हैदरखान मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसीलदार डॉ. सौ. अपर्णा मोरे-धुमाळ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पंचायत समिती सभापती सौ.कविता चौगुले, सरपंच हैदरखान मोकाशी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
   यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या समन्वयामुळे संभाव्य महापुराचा धोका टळला आहे. काही अंशी दिलासा मिळाला आहे. अशातच कोरोनाच्या आपत्तीचा सामना करत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचे वापर करून कोरोनाचा धोका टाळावा.सामाजिक बांधिलकी जोपासत सलमान खान आणि फौंडेशनने गावाला दत्तक घेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.
      व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात बोलताना एलान फौंडेशचे आकाश कपूर म्हणाले सलमान खान आणि एलान फौंडेशनने दत्तक घेतलेल्या घरांचे लवकरच बांधकाम लवकरच पूर्ण करून ग्रामस्थांना हक्काचे घर निर्माण करून देणार असल्याचे सांगितले . यावेळी प्रतीक चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत मियाखान मोकाशी. प्रास्ताविक संतोष जुगळे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी महालिंग अकीवाटे यांनी मानले.

पायाभरणी करताना राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील -यड्रावकर उपस्थित जिल्हाधिकारी दौलत देसाई,तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे-धुमाळ आदी

    यावेळी उपसरपंच ललिता काळे,पोलीस पाटील दिपाली पाटील,नगरसेवक जवाहर पाटील, रविकांत कारदगे, हिदायतुला मुजावर, मंडल अधिकारी विनायक माने तलाठी सुनील बाजारी,पंचायत समिती  चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!