कोल्हापुरात एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी दाखल होणार -मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर /ता : ५

      राज्यात दोन दिवस असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिव यांच्याशी चर्चा केली . सर्व प्रकारची आवश्यक मदत करण्याचे आदेश दिले . चर्चेमध्ये सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थितीबाबत पुर्ण विस्तृत माहिती दिली . कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफची पथके पाठविण्यासाठी आग्रह केला .

        धरणक्षेत्रामध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा व कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे . तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर धरणाखालील येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे . सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह जवळपास सर्व नद्याखालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहेत . त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवतो . बैठकीदरम्यान नाम . यड्रावकर यांनी सांगितले . खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकरिता आणखी ज्यादा एनडीआरएफ ची पथके मिळावीत . अशी मागणी केली . बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके तातडीने कोल्हापूरकडे रवाना करण्यासाठी आदेश आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले आहेत . तात्काळ संचालक येवलकर यांनी एनडीआरएफच्या पुणे येथील प्रमुखांना दोन पथके कोल्हापूरला रवाना करण्याबाबतच्या सूचना दिल्या .
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पूरपरिस्थितीबाबत शासनाला अवगत केले होते . आपत्ती व्यवस्थापन संचालक येवलकर यांनी वरील आदेश दिले . गुरुवारपर्यंत एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल होतील . अशी माहीती राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी दिली .

error: Content is protected !!