वसई /ता : २४ सुर्यकांत देशपांडे
वसई येथे संपूर्ण भारतवर्षात एकमेव अशा, परम पूजनिय वासुदेवानंद स्वामी सरस्वती महाराज अर्थात थोरले महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असुन, सध्याच्या लाँकडाउनमुळे काम दिर्घकाळ खंडित ठेवावे लागेल, तथापि, यापुढे कामात गती घेतली जात आहे . असे संस्थेचे अध्यक्ष श्री सौरभ भोळे यांनी सांगितले.अखंड दत्तनामाची गंगा घरोघर पोहचविणारे साक्षात दत्तावतारी यतिचक्रवर्ती परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चिंतू पाडा ,लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ ,पालघर पश्चिम येथे उभारले जात असुन संस्थेच्या उपक्रम पैकी हे भव्य काम आहे.

या भव्य व दिव्य मंदिराचा भूमिपूजन गेल्या वर्षी श्री सौरभ भोळे अध्यक्ष श्रीपाद वल्लभ सेवा संस्था,वसई यांच्या हस्ते संपन्न झाला.मंदिराची व्यापकता आणि आवश्यक ती शुचिर्भूत सेवा प्राप्त करताना अनेक अडचणी येत असल्या तरी स्वामी कृपेने कृपेने लवकरच हे काम पुर्ण होईल असा विश्वास ,भोळे यांनी व्यक्त केला आहे. मंदिर उभारणीच्या संस्थेच्या कार्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या मध्ये श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील परम पूजनीय दंडी स्वामि निर्मलानंद तिर्थ ,तसेच श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील संस्थांचे विश्वस्त श्री शेजवलकर ,श्री गवारीकर ,श्री योगी चित्रपटाचे निर्माते श्री उत्तम (माऊली ) मयेकर ,पुरोहित, श्री दत्त महाराजांची राजधानी असलेले श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील श्री संजय पुजारी,थोरल्या स्वामींच्या जन्म स्थानाचे श्री क्षेत्र माणगांव येथील विभवजी पेंढारकर, श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील श्री दिगंबरजी नवरे आदि श्री उपासक विद्वतजनांचे अशिर्वाद व शुभेच्छा प्राप्त झाले असून ,मंदिराचे पावित्र्य आणि उपासना या अनुशंगाने वरील अधिकारीजनांच्या मार्गदर्शन खाली संस्थेची वाटचाल गतिमान होत असल्याचे हि यावेळी श्री भोळे यांनी सांगितले आहे.शिवाय संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हि हाती घेतले जात असल्याचे हि त्यांनी सांगितले.