कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत . हे प्रमाण देशात उच्चांकी आहे . ते कमी करण्यासाठी जिल्ह्यात 10 ते 14 दिवसांच्या कडक lockdown लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही . पालकमंत्री सतेज पाटील आल्यानंतर दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल , अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली . या लॉकडाऊनमध्ये दुध आणि औषधसेवा वगळता सर्वच बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले .

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनास्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते . यावेळी आमदार राजेश पाटील , महापालिका आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते .