कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाचा जोर वाढणार असून गुरुवारपर्यंत सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा, विदर्भ, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह कोकण आणि गोव्यातही पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विटही केले आहे.

संग्रहित


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. तथापि, शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
सप्टेंबरची सुरुवात चांगली झाली असून राज्यात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि विदर्भात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात 7 सप्टेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

error: Content is protected !!